

Kargil's Women Warriors
esakal
Women in Kargil 1999: दरवर्षी २६ जुलै रोजी देशामध्ये कारगिल विजय दिवस अत्यंत अभिमानाने साजरा केला जातो. १९९९ मधील कारगिल युद्धात भारतीय सैन्याने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची ही आठवण आहे. या युद्धात शौर्य गाजवणारे पुरुष सैनिक आणि अधिकारी यांच्यासोबतच भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. त्यांनी कठीण परिस्थितीत बजावलेल्या भूमिकेने भारतीय लष्करी इतिहासाला नवी दिशा दिली.
कारगिल युद्धादरम्यान महिला अधिकाऱ्यांनी फक्त साहाय्यक भूमिकाच पार पाडली नाही, तर प्रत्यक्ष युद्धक्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली. शत्रूच्या गोळीबारात हेलिकॉप्टर उडवण्यापासून ते जखमी जवानांवर उपचार करणे आणि लष्करी संप्रेषण (Communication) सुरळीत ठेवण्यापर्यंत सर्वच आघाड्यांवर महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले.