

Kaushambi Accident
esakal
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात नॅशनल हायवे-२ वर एक हृदयद्रावक भीषण अपघात झाला आहे. मुंज आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला असून, या अपघातात तीन निष्पाप मुलांसह एकूण ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
शनिवारी (२८ मार्च २०२६) सकाळी सैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोरमा गावाजवळ भरधाव पिकअप आणि ट्रेलरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेचा आवाज इतका भीषण होता की आसपासच्या परिसरात खळबळ उडाली.