

Kerala CM Pinarayi Vijayan Declares State Free of Poverty Says Not a Single Poor Person Left
Esakal
साक्षरतेबाबत केरळ राज्य नेहमीच चर्चेत असतं. आता सध्या राज्यात गरीबी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींची चर्चा देशात होत आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी राज्याच्या विधानसभेत केरळमध्ये गरीबी संपुष्टात आणल्याची घोषणा केली. एलडीएफ सरकारने दावा केला की, गरीबी संपुष्टात आलेलं केरळ देशातलं पहिलं राज्य आहे. राज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही घोषणा केलीय.