घरी चिमुकल्या पावलांची चाहूल आणि वडिलांनी विमान अपघातात सोडले प्राण

akhilesh-sharma.jpg
akhilesh-sharma.jpg

मथुरा- केरळ स्थित कोझिकोडे येथे एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेत वैमानिकांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने एअर इंडियाचे वैमानिक मथुराचे रहिवासी असलेले अखिलेश शर्मा यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अखिलेश यांची पत्नी मेघा या गरोदर आहेत. विशेष म्हणजे त्यांची 10 दिवसानंतर डिलीवरी होणार आहे. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते, पण अखिलेश यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर पडली. कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून त्यांना अखिलेश आता या जगात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.

अखिलेश शर्मा यांच्या मृत्यूची माहिती मिळताच मथुरेच्या गोविंद नगर भागात असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली. तुलसीराम शर्मा यांचे पुत्र 32 वर्षीय अखिलेश शर्मा एअर इंडियामध्ये को-पायलट होते. शुक्रवारी कोझिकोडे विमानतळावर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांच्या पाया खालची जमीन सरकली आहे. 

'आत्मनिर्भर' भारताच्या भूमिकेमुळे चीन हैराण!

अखिलेश शर्मा यांचे लग्न होऊन दोन वर्ष झाले आहेत. त्यांचे 10 डिसेंबर 2018 रोजी मेघा यांच्याशी विवाह झाला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार अखिलेश टाळेबंदी होण्याच्या आधी घरी आले होते. त्यांच्या कुटुबांत 2 भाऊ, एक बहीण, आई-वडील आणि पत्नी मेघा आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या लँडिगवेळी गीअर खराब झाल्याने वैमानिकाला पहिल्यांदा लँडिंग करता आली नाही. त्यामुळे वैमानिकांनी इंधन कमी करण्यासाठी 15 मिनिट विमान धावपट्टीवर उतरवले नाही. त्यानंतर वैमानिकांनी पुन्हा लॅडिंगचा प्रयत्न केला. मात्र, जोराच्या पावसामुळे विमान धावपट्टीवरुन घसरले आणि दरीत कोसळले. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.  वैमानिकाने पहिल्या प्रयत्नात लँडिंगचा निर्णय घेतला असता तर अपघात यापेक्षा मोठा झाला असता असं सांगण्यात येत आहे. तसेच विमानाला आग लागली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. 

मोठी बातमी : विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; अपघाताचे कारण होणार स्पष्ट!

केरळच्या कोझिकोड विमानतळाची धावपट्टी टेबलटॉप पद्धतीची आहे. कोझिकोडची धावपट्टी भारतातील सर्वात सुंदर अशा धावपट्ट्यांपैकी एक आहे. मात्र, ही धावपट्टी लँडिंगसाठी धोकादायक मानली जाते. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्स्प्रेस एएसबी1344, बोइंग 737 हे विमान दुबईतून कालिकतकडे निघाले होते. यावेळी विमानात क्रूसह 191 प्रवासी होते. विमान दुर्घटनेचं कारण धावपट्टी टेबलटॉप असल्याचं सांगितलं जात आहे. धावपट्टीच्या दोन्ही बाजूला डोंगर आणि दऱ्या आहेत. टेबलटॉप धावपट्टीमध्ये धावपट्टी संपल्यानंतर पुढे जागा शिल्लक नसते. त्यामुळे अशा धावपट्टीवर विमान उतरवताना काळजी घ्यावी लागते. विमान घसरलं तर ते थेट दरीत कोसळण्याची शक्यता असते. कोझिकोड इथंही असंच झालं असण्याची शक्यता आहे. 

(edited by-kartik pujari)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com