तिरडीवरुन उठला अन् कापला केक...

lal bihari 25 rebirth celebration in UP
lal bihari 25 rebirth celebration in UP

लखनौः तिरडी बांधली होती, त्यावर शरीर ठेवण्यात आले होते. पण, काही वेळानंतर तिरडीवरील व्यक्ती उठली अन् चालू लागली. शिवाय, पुढे जाऊन त्या व्यक्तीने केकही कापला. प्रत्यक्षात ही घटना घडली आहे. पण, ती सरकारी लालफितीचा कारभाराचा निषेध करण्यासाठी.

उत्तर प्रदेशातील आजमगडमधील येथील ही घटना आहे. लाल बिहारी (वय 64) यांना 25 वर्षापूर्वी सरकारी कागदपत्रात मृत म्हणून घोषित केले होते. मात्र, लाल बिहारी आजही जिवंत आहेत. दरवर्षी अशाच पद्धतीने पुर्नजन्म सोहळा साजरा करतात. लाल बिहारी यांच्यासोबत हा पुर्नजन्म सोहळा साजरा करण्यासाठी चित्रपट निर्माते सतीश कौशिक उपस्थित होते. सतीश कौशिक लाल बिहारी यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

लाल बिहारी म्हणाले, 'जमिनीच्या वादातून सरकारी अधिकाऱ्यांनी मला 1976 मध्ये कागदोपत्री मृत घोषित केले होते. याविरोधात अनेक वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर 30 जून 1994 रोजी लाल बिहारी स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यात यशस्वी झाले. त्याच दिवसाला पुर्नजन्म म्हणून साजरा करतो. देशातील 20 हजार जणांना जिवंत असून, मृत घोषित केले आहे. न्यायालय तसेच सरकारी कार्यालयात अनेक जण आवाज उठवित आहेत. काही दिवसांपूर्वीच मानवाधिकार आयोगाने 1500 लोकांना पुन्हा कागदोपत्री जिवंत घोषित करण्याचे आदेश दिले आहेत.'

दरम्यान, सरकारी लाल फितीत सापडलेल्या लाल बिहारी यांनी उत्तर प्रदेश सरकारविरोधात 20 कोटी रुपये भरपाई देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com