
काश्मीरमधून कलम 370 हटवून काय झालं असा प्रश्न मोदी सरकारला विचारला.
नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत बजेटच्या चर्चेवर उत्तर दिलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर जोरात हल्लाबोल केला. यात त्यांनी काश्मीर मुद्यावरून काँग्रेसवर अनेक आरोप केले.
अमित शहा म्हणाले की, कलम 370 हटवण्याच्यावेळी जी वचने दिली ती पूर्ण केली नाही असा आरोप केला गेला. त्याचं काय झालं असं विरोधकांनी विचारलं. पण कलम 370 वर 17 महिने झालेत फक्त. तुम्ही 70 वर्षे काय केलंत त्याचा हिशोब घेऊन आला आहात का? ज्यांनी पिढ्यानपिढ्या राज्य केलं त्यांनीही उत्तर द्यावं असंही शहांनी म्हटलं.
I have said in this House & I say it again that this Bill has got nothing to do with the statehood of Jammu & Kashmir. Statehood would be given to Jammu & Kashmir at an appropriate time: Union Home Minister Amit Shah https://t.co/2AgL6Dnfuq
— ANI (@ANI) February 13, 2021
हे वाचा - मोदी असोत किंवा मनमोहन सिंग, पंतप्रधानांचा नेहमीच अपमान करतात राहुल गांधी- सीतारामन
काय म्हणाले अमित शहा
काश्मीरमधून कलम 370 हटवून काय झालं असा प्रश्न मोदी सरकारला विचारला. काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी म्हणाले की, काश्मीरी पंडितांना वचने दिली पण ती पूर्ण केली नाहीत. गिलगिट बाल्टिस्तान आणण्याची वक्तव्ये केलीत. ते दूरच किमान जे लोक काश्मीरमध्ये परत येऊ इच्छित आहेत ते तरी करा असंही काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं.