

LPG Crisis
ESakal
पश्चिम आशियातील युद्धामुळे देशात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. २३ मार्चपासून व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा संकटापूर्वीच्या पातळीच्या ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. सरकारचे लक्ष विशेषतः अन्न सेवा क्षेत्र आणि सामुदायिक स्वयंपाकघरांवर केंद्रित असून जनतेला दिलासा देणे आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करणे हा त्यामागील उद्देश आहे.