D. K. Shivakumar: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आक्षेप आश्चर्यकारक : कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, नेमकं काय म्हणाले?

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ मे रोजी आमचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले आहे. धरणाची उंची वाढवल्यास महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पूरस्थितीला तोंड द्यावे लागेल. यासाठी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
D. K. Shivakumar
D. K. Shivakumarsakal
Updated on

बंगळूर : कृष्णा लवादाच्या निकालानुसार कर्नाटकाच्या वाट्याचे पाणी अडविण्यासाठी आलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवणे आवश्यक आहे. न्यायाधीकरणाचा निकाल आला, तेव्हा मौन बाळगणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आक्षेप व्यक्त करणे आश्चर्यकारक आहे, असे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com