सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू
सुधारित निवृत्तिवेतनासाठी १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आले. मार्च २०२४ पासून योजना लागू होऊनही रखडलेली कार्यपद्धती अखेर सरकारकडून लागू करण्यात आली. २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळातील अखेरच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तिवेतन व महागाई भत्तावाढ लागू करण्यात आला आहे. अर्थात त्यासाठी सुधारित योजना कर्मचाऱ्यांना स्वीकारावी लागेल.