Shiv Sena Case: राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदा; सुप्रीम कोर्टानं फटकारलं

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी पार पडली.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टानं राज्यपालांच्या भूमिका बेकायदा ठरवल्या आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रावरुन राज्यपालांनी कारवाई सुरु करणं चुकचं होतं, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

निकाल देताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, "महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घेतलेले निर्णय हे भारतीय राज्यघटनेनुसार नव्हते. असंतुष्ट आमदारांना सरकारला पाठिंबा काढून घ्यायचा आहे, असं सूचित करणाऱ्या कोणत्याही संवादावर राज्यपालांनी भूमिका घेता कामा नये. उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावलं असल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी राज्यपालांनी शिंदे गटाच्या ठरावावर अवलंबून राहिले ही त्यांनी चूक होती, असंही सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना म्हटलं आहे"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com