खोटेपणा हाच मोदी सरकारचा 'हॉलमार्क': अरुण शौरी

arun-shourie
arun-shourie

नवी दिल्ली : 'खोटेपणा ही नरेंद्र मोदी सरकारची ओळख आहे. रोजगारनिर्मितीसारख्या अनेक आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहेत.' अशी जोरदार टीका माजी केंद्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांनी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी देशाच्या जनतेला सरकारच्या कामाकडे बारकाईने लक्ष देण्याची विनंती केली.

नवी दिल्ली येथे झालेल्या टाइम्स लिट फेस्टिव्हलमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमध्ये मंत्री असलेले शौरी म्हणाले की, मी अशी अनेक उदाहरणे देऊ शकतो, ज्यात अनेक वृत्तपत्रांमध्ये संपूर्ण पानभर मुद्रा योजनेमार्फत साडे पाच कोटीहून अधिक रोजगार निर्मितीची आकडेवारी दिलेली असते. पण यात काही आश्चर्यकारक बाब नाही, खोटं बोलणे ही या सरकारची ओळख बनली आहे.

शौरी यांनी सांगितले की, 'एखाद्या नेत्याने बराच काळ काय काम केले हे पाहण्यापेक्षा, त्याने केलेले काम हे बारकाईने तपासून बघणे महत्त्वाचे आहे. महात्मा गांधींच्या कामाचे अनुसरण करण्यापेक्षा त्यांचे विचार व चारित्र्य यातून काय शिकू शकतोय़ याचा विचार करा. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग व नरेंद्र मोदी यांबाबत आपण हे ओळखण्यात दोन वेळा संधी गमावल्या आहेत. हे नेते ज्या क्षणी जी गोष्ट सोयीस्कर वाटेल ती गोष्ट बोलतात. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारवर टीका करताना शौरी म्हणाले, 'आज सत्तेचे झालेले हे केंद्रीकरण बघून आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत, पण हे गुजरात मॉडेलसारखे आहे.' असहिष्णुता, हिंसाचार आणि विचारधारांमधील वादविवाद या विषयांवर बोलतानाही शौरी यांनी सरकारवर टीका केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com