दैवी शक्ती असल्याचा बनाव करून धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली खंडणीचे जाळे उभारणाऱ्या अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ताब्यात असलेल्या खरातच्या चौकशीतून त्याच्या साथीदारांकडून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा फिरवला जात असल्याचे उघड झाले असून एका व्यावसायिकाकडून एकाच दिवशी तब्बल १३ कोटी ५० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. काळा पैसा पांढरा करण्यासाठी दोन पतसंस्थांचा वापर केल्याचेही तपासात स्पष्ट झाले असून या संस्थांमधून सुमारे २०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत रोख रक्कम, विदेशी चलन, सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत.