
मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शांतीश्री पंडित (JNU Vice Chancellor Shantishree Pandit) यांची नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, ही नियुक्ती वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण, अनेकांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला असून नियुक्ती चुकीची असल्याचा आरोप केला आहे. याबाबत आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) केंद्राला पत्र लिहिणार आहेत.
पुणे विद्यापीठाला भेट दिली होती तेव्हा सांगण्यात आलं की शांतीश्री पंडित यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच त्यांची वेतनवाढ देखील थांबवण्यात आली होती. मग अशा लोकांना जेएनयूच्या कुलगुरूपदी कसं काय नेमण्यात आलं? त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबत केंद्राला पत्र लिहिणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
पुणे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांचे आरोप -
शांतीश्री पंडित या पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची थेट जेएनयूच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण, ही नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा आरोप पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि ‘नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया’चे (एनएसयूआय) माजी अध्यक्ष विजय शिंदे यांनी केला आहे.
नेमका वाद काय? -
विदेशी विद्यार्थ्यांच्या कोट्यातील बेकायदा प्रवेश प्रकरणात (पीआयओ) नोकरीतील सेवाशर्तींचे उल्लंघन केल्याचा आरोप डॉ. पंडित यांच्यावर आहे. याचप्रकरणी त्यांची पाच वेतनवाढ रोखण्यात आली होती. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली होती. त्यामुळे पुणे विद्यापीठाने एक समिती स्थापन करून ३६ पानी अहवाल तयार करून कारवाई करण्याची शिफारस केली होती, अशी माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.