मोदी सरकारने देशाच्या सीमेला सुरक्षित केले - शहा

मोदी सरकारने देशाच्या सीमेला सुरक्षित केले - शहा

अमृतसर - सीमा सुरक्षेच्या मुद्‌द्‌यावरून आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीवर (यूपीए) हल्ला चढविला. गांधी परिवाराची सत्ता असताना कोणीही येऊन देशाच्या सीमेचा अपमान करत होते; परंतु नरेंद्र मोदी सरकारने सीमा सुरक्षित केल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

पंजाबी सुबाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. एकेकाळी गांधी घराण्याची 10 वर्षे सत्ता असताना कोणीही एखाद्याच्या इच्छेवरून देशाची सीमा अपमानित करू शकत होते; परंतु मोदी सरकारने हे प्रकार बंद करत सीमा सुरक्षित केली असल्याचे त्यांनी सांगितले. सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांना अनेक वर्षांत जे जमले नाही, ते मोदी सरकारने केवळ अडीच वर्षांतच करून दाखविल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आज भारताच्या सीमेकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जाते, हे संपूर्ण जगाला कळले असून, मोदी सरकार आल्यापासूनच या गोष्टी बदलल्या असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीही अनेक कामे केली असून, गरीब, दलित आणि आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी अनेक नवीन योजनाही आणल्याचे सांगत यामुळेच आता देशात एक नवी बदलाची लाट असल्याचे सांगितले. या वेळी शहा यांनी शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्या युतीला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही केले. पुढील पाच वर्षांसाठी सत्ता कोणाकडे असेल, हे पंजाबची जनता ठरवणार असून, एकीकडे पंजाबच्या हिताचा विचार करणारी आमची युती, तर दुसरीकडे येथील तरुणाईला नशाबाज म्हणणारे कॉंग्रेस अशी स्थिती असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com