Monsoon : लवकर आलेल्या मान्सूनने झोडपलं, भूस्खलन आणि पूर; पूर्वोत्तर राज्यांमध्ये १९ जणांचा मृत्यू, १२ हजार लोकांचं स्थलांतर

Monsoon Rain : पूर्वोत्तर राज्यांमधील मणिपूर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय.
Rain
Rainesakal
Updated on

देशाय यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे. या मान्सूनने पूर्वोत्तर राज्यांमध्ये हाहाकार उडाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पूर्वोत्तर राज्यांमधील मणिपूर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हजार पेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय. मोठ्या संख्येनं लोकांना फटका बसला आहे. नद्या पात्राबाहेर पडल्या असून हवामान विभागाने राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com