मोदींच्या काळात सर्वाधिक दहशतवादी मारले : अमित शहा

मोदींच्या काळात सर्वाधिक दहशतवादी मारले : अमित शहा

उमरिया (म. प्र.) : आगामी निवडणूक ही भारताला आणि अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी व्हावी, पंतप्रधान होण्याची "युवराजां'ची इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे, असा टोला आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मारला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सर्वाधिक संख्येने दहशतवादी मारल्याचा दावाही शहा यांनी केला.

भाजपने आयोजित केलेल्या "विजय संकल्प' सभेमध्ये अमित शहा यांनी विरोधकांवर हल्ला चढवीत हवाई कारवाईबाबत शंका उपस्थित केल्याबद्दल टीका केली. "देशाला, अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ही निवडणूक व्हावी, वय होत चाललेल्या नेत्यांची आणि एका कुटुंबाची पंतप्रधानपदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे,' असे शहा या वेळी म्हणाले. भारताने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई कारवाईवर शंका उपस्थित करून विरोधक या घटनेचे राजकारण करू पाहत आहेत, असे म्हणत शहा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.

वन रॅंक वन पेन्शन योजना, राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती याला विलंब लावल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसला धारेवर धरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com