माझ्या वडिलांच्या निधनानंतर भाजपमधून विश्वास, वचनबद्धता संपली : उत्पल पर्रीकर

माझ्या वडिलांच्या निधनानंतर भाजपमधून विश्वास, वचनबद्धता संपली : उत्पल पर्रीकर

नवी दिल्ली : माझ्या वडिलांच्या निधनानंतर पक्षाने दुसरा मार्ग स्वीकारला. भाजपमधून आता विश्वास आणि वचनबद्धता यांसारखे शब्द संपले आहेत, अशी टीका गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी केली. माझे वडील हयात असताना पक्षात विश्वास आणि वचनबद्धता यांसारख्या शब्दांना महत्त्व होते. मात्र, आता या गोष्टी राहिल्या नाहीत, असेही ते म्हणाले.

गोव्यात काँग्रेसच्या 10 आमदारांच्या भाजपमध्ये प्रवेशावरून उत्पल पर्रीकर पीटीआयशी बोलत होते. ते म्हणाले, "माझे वडील जिवंत असताना पक्षात विश्वास आणि वचनबद्धता यांसारख्या शब्दांना महत्त्व होते. ही पक्षाची मूल्ये होती. पण 17 मार्चनंतर दोन्ही शब्द पक्षातून गायब झाले आहेत. आता पक्षाने वेगळीच दिशा पकडली आहे. त्यामुळे काय योग्य हे वेळच सांगेल.

कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये : मुख्यमंत्री सावंत

काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये सहभागी होत असताना त्यांनी कोणतीही अट घातली नाही, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com