महाराष्ट्रासह देशातील शेतकरी चिंतेत: राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली - महाराष्ट्रात सुरु असलेले शेतकरी आंदोलन हे फक्त राज्यापुरते मर्यादीत नसून, पूर्ण देशात अशीच परिस्थिती आहे. शेतकरी चिंतेत आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र किसान सभेच्या झेंड्याखाली नाशिकहून दरमजल शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ सोमवारी आझाद मैदानावर धडकला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी विधान भवनात चर्चा करतील. त्या वेळी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याबाबतचे लेखी निवेदन सरकारकडून विधिमंडळात करण्यात येणार असल्याचे समजते. परिक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हजारो शेतकऱ्यांनी मध्यरात्री पायपीट करत आझाद मैदान गाठले.  

देशभरातील शेतकरी समस्यांनी ग्रस्त आहेत, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या या मार्चाला भाजप वगळता सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com