Indian Railways
esakal
Indian Railways Special Trains : भारतीय रेल्वेने नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे. २६ सप्टेंबरपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत देशभरात ६,००० हून अधिक विशेष गाड्या धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या मते, दिवाळी (Diwali Special Trains) आणि छठ पूजा यासारख्या सणांच्या काळात प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.