'सरकारच्या 'या' योजनेत राफेलपेक्षाही मोठा गैरव्यवहार'

'सरकारच्या 'या' योजनेत राफेलपेक्षाही मोठा गैरव्यवहार'

अहमदाबाद : पंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल करारापेक्षाही मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केला आहे. 

अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय किसान स्वराज संमोलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पंतप्रधान पीक विमा योजनेत झालेला गैरव्यवहार हा सगळ्यात मोठा गैरव्यवहार आहे. हा गैरव्यवहार सध्या गाजत असलेल्या राफेल प्रकरणापेक्षाही मोठा असल्याचे साईनाथ यांनी सांगितले.

साईनाथ म्हणाले की, वर्तमान सरकारची नीती ही शेतकरी विरोधी आहे. रिलायन्स, एस्सार सारख्या मोठ्या कंपन्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतील विमा प्रदान करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. महाराष्ट्राचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, 2.80 लाख शेतकऱ्यांची महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक घेतलेले आहे. म्हणजे एका जिल्ह्यात 19.2 कोटी रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांकडून विमा कंपनीला दिली गेली तर, राज्य सरकारकडून 77 कोटी रुपये आणि केंद्र सरकारकडून 77 कोटी रुपये एवढी रक्कम देण्यात आली. म्हणजे, एकूण 173 कोटी रुपये रिलायन्सला देण्यात आले. परंतु, रिलायन्सने एका जिल्ह्यात शेतकऱ्यांना केवळ 30 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. म्हणजेच रिलायन्सचा निव्वळ नफा 143 कोटी रुपये एवढा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com