s jaishankar with group of 21 Indians who survived the nepal deluge
sakal
नवी दिल्ली - जलप्रलयानंतर नेपाळमधून सुखरूप भारतात परतलेल्या २१ नागरिकांच्या गटाची परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी आज विचारपूस केली. या भारतीयांची नेपाळच्या सैन्याने कठीण परिस्थितीत सुटका केली. त्यानंतर काठमांडू येथून भारतीय दूतावासाने त्यांची परतण्याची व्यवस्था केली होती. नेपाळी सैन्याच्या मदतीची या नागरिकांनी प्रशंसा केली.