नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवेदन दिले. त्यावेळी पंतप्रधान मोदींचा संपूर्ण रोख काँग्रेसवर होता. पण, असे मुद्दे उपस्थित करून, पंतप्रधान देशाची दिशाभूल करत आहे. मूळ मुद्द्यांपासून भरकटत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर मीडियाशी बोलाताना केली.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान मोदींची भाषणाची स्टाईल देशातील जनेताल मूळ मुद्द्यांपासून दूर लोटत आहे. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस जवाहरलाल नेहरू, पाकिस्तान या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. पण, देशातील कळीचे मुद्दे बाजूलाच ठेवले. सध्या देशापुढं बेरोजगारी हा सर्वांत मोठा मुद्दा आहे. यावर आम्ही अनेकदा त्यांच्याशी बोलणं केलं आहे. पण, त्यांनी आपल्या निवेदनात या मुद्यावर एक शब्दही काढला नाही. पंतप्रधान मोदींचं सोडून द्या. पण, अर्थमंत्र्यांनी खूप मोठं भाषण केलं, पण त्यांनीही या मुद्द्यावर चकार शब्द काढला नाही.'
आणखी वाचा - लाठ्या खायला पाठ कडक करून घेतो : नरेंद मोदी
आणखी वाचा - लोकसभेत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला चिमटे
लोकसभेत राहुल गांधी भडकले
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात काँग्रेसला धारेवर धरले. काँग्रेसच्या मार्गानं चाललो असतो, तर अनेक कामं झाली नसती, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या टीकेचा समाचार घेतला. देशातील तरुणांच्या हाताला काम मिळालं नाही तर, ते लाठ्या हाणतील, अशी टीका राहुल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींवर केली होती. त्यावर लाठ्या खाण्यासाठी मी सूर्यनमस्कार वाढवतो आणि पाठ मजबूत करून घेतो, असं उत्तर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत दिलं. त्यावेळी राहुल यांनी पंतप्रधानांना थांबवत 'माझे म्हणणे नीट समजून घ्या', असा सल्ला दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.