नवी दिल्ली : हरियानातील करनाल येथे शेतकरी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारामुळे दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र आहे. करनाल येथील आंदोलक शेतकऱ्यावर झालेला लाठीमार व ‘ या शेतकऱ्यांची टाळकीच फोडा,‘ हा आयुष सिन्हा नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा व्हायरल झालेला आदेश, यामुळे आंदोलक शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. (National News)
कर्नालच्या लाठीमारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रकरण आणखी चिघळले तर सिन्हा यांच्यावर कारवाईचे निर्देश दिल्लीतून मिळू शकतात. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला हेही लाठीमारानंतर अस्वस्थ असल्याची माहिती भाजपच्या दिल्ली दरबारी पोचली असून चौताला यांच्यावर ‘साम दाम दंड भेद'' याचा वापर करून त्यांनी भाजपबरोबरच राहण्यासाठी ‘कृष्ण मेनन मार्गावरून' हालचाली वेगवान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
चलो उत्तर प्रदेशचा नारा
येत्या ५ सप्टेंबरला मुझफ्फरपूर येथील महापंचायतीपासून शेतकऱ्यांच्या ‘मिशन यूपी’ला प्रारंभ होणार असून यामध्ये शेतकरी नेते संपूर्ण उत्तर प्रदेश पिंजून काढतील. कर्नाल लाठीमाराच्या निषेधार्थ हरियानातील नूर येथे आयोजित शेतकरी महापंचायतीला प्रतिसाद मिळाल्यानंतर शेतकरी नेत्यांनी ‘चलो उत्तर प्रदेश’चा नारा बुलंद केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.