काश्‍मिरात ‘एनआयए’चे योगदान सर्वाधिक - दोवाल

Ajit-Doval
Ajit-Doval

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादाविरोधातील संघर्षात राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) योगदान इतर कोणत्याही संस्थांपेक्षा अधिक असल्याचा दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज केला.

भारताविरोधात दहशतवाद हेच धोरण बाळगणाऱ्या पाकिस्तानवर ‘फायनान्शिअल ॲक्‍शन टास्कर फोर्स’च्या (एफएटीएफ) कारवाईचा सर्वाधिक दबाव आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

सर्व राज्यांच्या दहतवादविरोधी पथक तसेच विशेष कृतिदलाच्या प्रमुखांची बैठक राष्ट्रीय तपास संस्थेत झाली. विज्ञान भवनात झालेल्या परिषदेदरम्यान बोलताना ते म्हणाले, ‘‘एखाद्या गुन्ह्याला सरकारचा पाठिंबा मिळत असेल, तर ते मोठे आव्हान ठरते आणि असा पाठिंबा देण्यात काही देशांनी विशेष कौशल्य मिळविले आहे. पाकिस्तानने असा दहशतवाद म्हणजे आपले धोरणच ठरविले आहे.’’ 

देशातील दहशतवाद संपविण्याचे उद्दिष्ट बाळगा, अशी सूचनाही दोवाल यांनी ‘एनआयए’ला केली. ‘एनआयए’मुळेच परदेशातून आर्थिक मदत मिळविणाऱ्यांच्या नाड्या आवळण्यात यश आल्याचे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com