शेती उत्पादनांच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे पायी निघालेल्या 101 शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून शनिवारी चर्चेच्या दृष्टीने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दिल्लीकडे कूच करतील. पंजाबचे शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर यांनी शनिवारी सांगितले की, शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणताही संदेश मिळालेला नाही, म्हणून शेतकऱ्यांचा गट 8 डिसेंबर रोजी दिल्लीच्या दिशेने निघाला आहे. शुक्रवारी, पंजाब-हरियाना सीमेवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबारामुळे काही शेतकरी जखमी झाल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनीआपला पायी मोर्चा स्थगित केला होता.