'आता राममंदिराबाबत आश्वासने बास'

'आता राममंदिराबाबत आश्वासने बास'

अयोध्या : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातून अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाविषयी विविध संघटनांकडून मागण्या होत असतानाच आता अयोध्यातील स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आता राम मंदिराबाबत सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, आश्वासने आता थांबायला हवीत आणि या दिवाळीला राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरवात व्हावी, अशी आशा स्थानिकांनी सरकारकडे व्यक्त केली आहे.

अयोध्यातील स्थानिक लोकांना बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर लवकर राम मंदिर व्हावे असे वाटत आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या वर्षी या जागेवर दिवे लावून दिपावली साजरी करण्यात येत आहे. यावेळी स्थानिकांनी सांगितले की, दरवर्षी दिवे लावल्याने आकर्षण चांगले वाढले आहे, यामुळे पर्यटक या जागेला भेट देतील. परंतु, राम मंदिर बांधण्याबाबत सरकार तेवढे गंभीर दिसत नाही. मंदिराच्या बांधकामाचा निर्णय लवकर घ्यायला हवा. 

दरम्यान, अयोध्यातील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, जर 2019 निवडणुकांपुर्वी जर सरकारने राम मंदिराचा निर्णय घेतला नाही तर, हे सरकार परत सत्तेत येणे कठीण आहे. यामुळे सरकारने राम मंदिराबाबत लवकर निर्णय घ्यायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com