Rahul Gandhi : शेतकरी अन् तरुणांचे कुणीच ऐकत नाही; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

‘या देशातील शेतकरी किमान हमी भावाची (एमएसपी) मागणी करत आहेत तर तरुणांना रोजगार हवा आहे पण त्यांचे म्हणणे कुणीच ऐकून घेत नाही.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

जयपूर - ‘या देशातील शेतकरी किमान हमी भावाची (एमएसपी) मागणी करत आहेत तर तरुणांना रोजगार हवा आहे पण त्यांचे म्हणणे कुणीच ऐकून घेत नाही. या देशामध्ये लोकशाही आणि राज्यघटना टिकणार की नाही? याचा फैसला याच निवडणुकीमध्ये होईल,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज येथील सभेत केले.

राहुल म्हणाले, ‘ही निवडणूक या देशातील मागासवर्गीय, दलित, आदिवासी व गरीब जनतेची आहे. हे सरकार चोहोबाजूंनी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असून पक्षाची बँक खाती देखील गोठविण्यात आली आहेत. ही निवडणूक देशातील गरीब जनता विरुद्ध २२ ते २५ मोजके अब्जाधीश उद्योजक यांच्यातील आहे.’ काँग्रेसचे उमेदवार गोविंदराम मेघवाल व कुलदीप इंदोरा यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन केले होते.

खटाखट पैसे येतील....

बिकानेर येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आमचे सरकार आल्यास दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांमधील कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये देण्यात येतील. ‘खटाखट खटाखट पैसे येत राहतील आणि एका झटक्यात आम्ही देशातील गरिबी हटवू’ असा दावा राहुल यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com