

CJP Says It Wants Solutions, Not Endless Talks; Centre Open to Negotiations
sakal
नवी दिल्ली: ‘नीट’ पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकाराच्या विरोधात गेल्या ३२ दिवसांपासून जंतरमंतर आंदोलनावर सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न सुरू केले असून कॉक्रोच जनता पक्षाशी (सीजेपी) पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शविली. पण ‘केंद्र सरकारशी व्यर्थ चर्चा करण्यासाठी आमच्यापाशी वेळ नाही. सरकारशी चर्चा करण्यासाठी आम्ही कोणत्याही मंत्र्याच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात जाणार नाही. मंत्र्यांनी जंतरमंतरवर यावे किंवा एखाद्या तटस्थ स्थळी भेटावे,’ असा पवित्रा ‘सीजेपी’ने आज घेतला.