Odisha Train Accident : फक्त लालबहादूर शास्त्रीच नाही तर रेल्वेचा अपघात झाल्यावर या दोन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिलेला..

नोव्हेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये अरियालूर रेल्वे अपघात झाला होता
Odisha Train Accident
Odisha Train Accident esakal

Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीशी समोरासमोर धडक झाली. या घटनेत कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले.

Odisha Train Accident
Health Tips: उन्हाळ्यात अंजीर खाल्ल्याने उद्भवू शकते गंभीर समस्या; लगेच जाणून घ्या

घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. या अपघाताने पुन्हा एकदा भारतीय रेल्वेच्या सर्व अपघातांची आठवण करून दिली. इतिहासाची पाने उलटून पाहिली तर लक्षात येईल की, दोन रेल्वे मंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता.

Odisha Train Accident
Odisha Train Accident : २३३ जणांचा जीव घेणारा तीन रेल्वेंचा अपघात नेमका झाला कसा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप?

लाल बहादूर शास्त्रींनी दिला होता राजीनामा

साधारण 1956 सालची गोष्ट असेल. नोव्हेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये अरियालूर रेल्वे अपघात झाला होता. त्यावेळी झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून भारताचे तिसरे रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री (13 मे 1952 ते 7 डिसेंबर 1956) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या अपघातात 142 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सचोटीची व्यक्ती म्हणून त्यांचा आदर केला आहे.

Odisha Train Accident
Odisha Train Accident: केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे रेल्वे अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, मृतांची संख्या 233 तर...

नितीश कुमार यांनी 1999 मध्ये दिला होता राजीनामा

त्याचवेळी, भारताचे 28 वे रेल्वे मंत्री नितीश कुमार (19 मार्च 1998 ते 5 ऑगस्ट 1999) यांनी आसाममध्ये ऑगस्ट 1999 मध्ये झालेल्या गॅसल ट्रेन दुर्घटनेसाठी नैतिक आधारावर आपलं मंत्री पद सोडलं होतं. या अपघातात 290 जणांना जीव गमवावा लागला.

ममता बॅनर्जी यांचा राजीनामा फेटाळण्यात आला

2000 साली दोन रेल्वे अपघात झाले होते. त्यावेळी रेल्वे मंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला होता. पण, त्यावेळी पंतप्रधान असलेल्या अटलबिहारी वाजपेयींनी त्यांचा राजीनामा नाकारला.

तर 2016 मध्ये कानपूरजवळ पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरले होते. यामध्ये 150 जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी रेल्वेमंत्री असलेले सुरेश प्रभू यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण, त्यांचा ही राजीनामा स्वीकारला गेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com