एक इंचही जमीन बाहेरच्यांना देणार नाही; काश्मीरमधील भावना

shrinagr band
shrinagr band

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये 35 ए हे कलम रद्द करून राज्याबाहेरील व्यक्तींना या राज्यात वास्तव्याचा, जमीन खरेदीचा अधिकार देण्यास विरोध करण्यासाठी श्रीनगरमध्ये कडकडीत बंद आहे. कलम हटविल्यास प्रचंड संघर्ष उफाळून येईल, अशी येथील संतप्त भावना आहे.
 

श्रीनगर, गांदरबल या जिल्ह्यांतील सर्व बाजारपेठांमधे कडकडीत बंद पाळण्यात आला. लाल चौक, गुलाब बाग रस्ता, डाऊनटाऊन यांसह काही भागात किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. श्रीनगर, गांदरबल या जिल्ह्यांतील सर्व बाजारपेठांमधे कडकडीत बंद पाळण्यात आला. हे कलम काश्मीरमधे हटविण्यासंबंधीचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यावर आज निकाल जाहीर होणार असल्याने काश्मीर जनतेने कडकडीत बंद पुकारून कलम रद्द करण्यास विरोध केला आहे.

जम्मू काश्मीर हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे. त्यावर बाहेरून अतिक्रमण झाले, तर पूर्ण पर्यटन व्यवसाय संपून जाईल. तसेच काश्मीरबाह्य लोकांचे वर्चस्व वाढेल म्हणून  कलम रद्द करण्यास विरोध आहे. जर कलम काढले, तर प्रचंड संघर्ष होईल. आम्ही येथील एक इंचही जमीन बाहेरील व्यक्तीच्या घशात कदापि जाऊ देणार नाही, अशी भावना येथील स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com