
Viral Video: पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. भारताने ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादशिवाय पाकिस्तानातील मुरिदके इथलेही दहशतवादी तळ उडवले. मुरिदकेत लष्कर ए तोयबाचं मुख्यालय होतं. हल्ल्यानंतर मुरिदकेतला एक व्हिडीओ समोर आलाय. लष्कर ए तोयबाच्या मुख्यालय उद्ध्वस्त झाल्याचं दिसतंय.