
इस्लामाबाद: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानला मोठा धडा शिकवला होता. या ऑपरेशनला अनेक महिने उलटून गेल्यानंतरही आता मोठे खुलासे समोर येत आहेत. 'जैश-ए-मोहम्मद'चा टॉप कमांडर मसूद इलियास कश्मीरी याने दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, जेव्हा भारताने ७ मे रोजी बहावलपूरमध्ये हल्ला केला, तेव्हा मसूद अजहरच्या कुटुंबाचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले.