

Operation Sindoor Turns One: How India’s BrahMos and Air Defence Systems Outclassed Pakistan’s Chinese Weapons
esakal
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूक्ष्म बदला घेण्यासाठी भारताने ७ मे २०२५ रोजी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या मोहिमेत पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य करताना भारतीय सशस्त्र दलांनी अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञान आणि प्रभावी रणनीतीचा वापर केला. पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र लवकरच त्यांना आपली ताकद भारतीय लष्करापुढे अपुरी पडत असल्याचे जाणवले. संघर्ष वाढवल्यास पाकिस्तानला अपरिमित नुकसान सहन करावे लागेल, हे स्पष्ट झाल्याने त्यांची स्थिती कमकुवत झाली.