

opposition leader Rahul Gandhi
sakal
रायबरेली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे गद्दार असून, त्यांनी काही मोजक्या उद्योजकांच्या हितासाठी देशहीतही विकले आहे,’’ असे वादग्रस्त वक्तव्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी रायबरेली येथील बहुजन स्वाभिमान सभेत केले. स्वातंत्र्य सैनिक वीरा पासी यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.