'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Pahalgam Terror Attack On Manoj Sinha : सिन्हा यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या घटनेचा संदर्भ घेतला. 'त्या दिवशी २६ निष्पाप नागरिकांची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. या हत्यांमागे पाकिस्तान आणि त्यांचे दहशतवादी होते.'
Pahalgam Terror Attack  On Manoj Sinha
Pahalgam Terror Attack On Manoj Sinhaesakal
Updated on

जम्मू : जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर (Pahalgam Terror Attack) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, 'या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून लवकरच त्यांचा खात्मा केला जाईल. त्यांच्याकडे जगण्यासाठी फार वेळ उरलेला नाही,' असे ठाम वक्तव्य सिन्हा यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com