

पाकिस्तान सध्या युद्धाच्या तयारीच्या गदारोळात आहे. भारतासोबतच्या सीमेवर तणाव वाढत आहे, लष्करी ताफे सीमावर्ती भागांकडे सरकत आहेत, लढाऊ विमाने आकाशात गर्जना करत आहेत, आणि सरकारी वाहिन्यांवर युद्धाच्या शक्यतांवर चर्चा जोरात आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे कठोर संदेश सातत्याने येत आहेत. पण या सगळ्या घोषणांमध्ये पाकिस्तानातील सामान्य जनता एकच प्रश्न विचारत आहे - "आम्हाला गोळ्या नको, भाकरी हव्यात!"