नवी दिल्ली- भारत सरकारने नव्याने तयार केलेल्या 500 व 2000 रुपयांच्या नोटेची पाकिस्तान व तेथील गुन्हेगारी संघटना नक्कल करू शकत नाही, असे गुप्तचर विभागाने म्हटले आहे.
भारत सरकारने नव्याने तयार केलेल्या नोटांची नक्कल होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली आहे. यामुळे पाकिस्तानला व तेथील गुन्हेगारी संघटनांना नव्या नोटांची नक्कल करणे अवघड होणार आहे, असे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
पाकिस्तानमधील पेशावरमध्ये भारतीय नोटांची सर्वाधीक छपाई होते. या नोटांमध्ये 500 व 1000च्या नोटांचा मोठा सहभाग होता. परंतु, भारत सरकारने 500 व 1000च्या नोटा बंद केल्यामुळे छपाई केलेल्या नोटांबाबत पाकची मोठी पंचाईत झाली आहे, असेही गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.