पाकने सतलज नदीत सोडले दूषित पाणी

पाकने सतलज नदीत सोडले दूषित पाणी

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानने सतलज नदीत प्रदूषित पाणी सोडले आहे. यामुळे पंजाबमधील बंधारे फुटले असून आसपासच्या गावात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. 

भारताच्या पंजाब राज्यातून वाहणा-या सतलज नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने फिरोजपूर जिल्ह्यातील ब-याच गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. त्यासाठी संबधित अधिका-यांना बंधारे देखील मजबूत करण्यास सांगितले होते.  मात्र ते काम चालू असतानाच पाकिस्तानने सतलज नदीत कारखान्यांतील प्रदूषित पाणी सोडले आहे, ज्यामुळे सीमेवरील गावांत रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

सध्या भारताचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल संबधित गावांत पोहोचले असून तेथील लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com