देशात ऑक्सिजनअभावी किती जणांचा मृत्यू? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Mansukh Mandaviya
Mansukh Mandaviyagoogle

नवी दिल्ली : देशात कोरोना काळात ऑक्जिनच्या कमतरतेमुळे मृत्यू (Oxygen Shortage Deaths) झालेल्यांचा आकडा राज्यांना मागविला होता. मात्र, फक्त १९ राज्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा कुठेही समावेश नसून महाराष्ट्राने अद्याप आकडेवारी दिलेली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी लोकसभेत दिली. कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किती जणांचा मृत्यू झाला? असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

Mansukh Mandaviya
पाकिस्तानातील उद्योगांवर बंदी घालायची का? SC ने UP सरकारला सुनावले

देशात किती जणांचा मृत्यू?

देशात ऑक्सिनच्या कमरतेमुळे किती जणांचा मृत्यू झाला याबाबतची माहिती सर्व राज्यांना पत्र लिहून मागवली होती. त्याला १९ राज्यांनी प्रतिदास दिला. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, तेलंगणा, आसाम, पंजाब, उत्तराखंड, त्रिपुरा, दादरा नगर हवेली, दीव-दमण, अंदमान, निकोबार, ओडिशा, जम्मू-काश्मीर, लडाख, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, पाँडीचेरी, अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्कीम, झारखंड, हिमाचल प्रदेश हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तसेच पंजाबने चार रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची माहिती लेखी स्वरुपात दिली आहे, असं मनसुख मांडविया यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन हा डेटा देण्याबाबत सांगितले होते. तरीही अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्रानेही याबाबत माहिती दिली नाही. या मुद्द्यावरून आधी देखील राजकारण सुरू होतं. दुर्दैवाने आताही हे राजकारण सुरू आहे. हा राजकारणाचा विषय नाही, असं मनसुख मांडविया म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com