Mohan Bhagvat: "...तेव्हापासून पाकिस्तानातील लोक आनंदी नाहीत"; मोहन भागवतांचं विधान

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा अखंड भारताचा उल्लेख केला.
Mohan Bhagvat
Mohan Bhagvate sakal

भोपाळ : स्वातंत्र्याच्या सात दशकांहून अधिका काळानंतरही पाकिस्तानातील लोक खूश नाहीत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. शुक्रवारी भोपाळमध्ये एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. (people of Pakistan are not happy Statement by Mohan Bhagwat)

भागवत म्हणाले, १९४७च्या विभाजनापूर्वी एक भारत होता. जे भारतापासून वेगळे झाले ते आता खूश आहेत का? पाकिस्तानातील लोक आज म्हणतात की भारताचं विभाजन एक चूक होती. यावेळी त्यांनी सिंधी समाजाचं कौतुकही केलं.

Mohan Bhagvat
Govinda & Rashmika : गोविंदा झाला रश्मिका मंदानाचा ‘सामी’; दोघांनी केला डान्स

दरम्यान, दशतवादी छावण्यांवर सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करताना ते म्हणाले, आम्ही हे करतो आणि करत राहू. भारताची दुसऱ्यांवर हल्ला करण्याीच संस्कृती नाही. आम्ही त्या संस्कृतीतील आहोत जिथं आत्मंसरक्षणासाठी सडेतोड उत्तर दिलं जातं.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आम्ही शाररिकदृष्ट्या ती भूमी त्यागली. पण कोणी विचारलं १९४७ पूर्वी भारत काय होता तर सांगाव लागेल की, भारत होता. सिंधूपासूनच हिंदू हा शब्द आला. आपण अखंड भारत म्हणतो तेव्हा सिंधू संस्कृती विसरु शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com