मोदी सरकारने शेतकऱ्यांची झोप उडविली : ममता

Mamata Banerjee
Mamata Banerjee

कोलकता : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांची झोप उडविली असून, निवडणुकीपूर्वी त्यांना फसवले जात असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. जर केंद्रात सत्ताबदल झाल्यास शेतकऱ्यांच्या हिताना प्राधान्य दिले जाईल, असेही ममता म्हणाल्या.

मेट्रो सिनेमा थिएटरसमोर रविवारी रात्रीपासून धरणे आंदोलन करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी फोनवरून शेतकरी सभेला मार्गदर्शन केले. नेताजी मैदानात सुरू असलेल्या सभेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी ममता बॅनर्जी यांचे भाषण लाउडस्पीकरवरून ऐकले. त्या म्हणाल्या, की देशात सुमारे12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला जात आहे. निवडणुकीच्या अगोदरच शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगत आहेत, मात्र त्यापूर्वीच आम्ही शेतकऱ्याचे उत्पन्न तिप्पट वाढविले आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com