PM Modi Interview : ''मी मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला जेलमध्ये टाकलं होतं'' ईडी कारवायांवरुन मोदी थेटच बोलले

''तपास यंत्रणांनी केलेल्या कारवायांमध्ये ड्रग्ज माफिया आणि भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. ज्यांनी बेकायदेशीररित्या संपत्ती गोळा करुन मालमत्ता निर्माण केल्या, अशा लोकांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत.''
PM Modi Interview : ''मी मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला जेलमध्ये टाकलं होतं'' ईडी कारवायांवरुन मोदी थेटच बोलले
esakal

Loksabha Election 2024 : विरोधी पक्षांच्या नेत्यांवर भाजपकडून जाणीवपूर्वक खोट्या केसेस टाकल्या जातात, या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर दिलं. 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ईडी कारवायांची टक्केवारी सांगितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ईडीने केलेल्या कारवाया ह्या त्यांच्याविरुद्धच जास्त आहेत ज्यांचा राजकारणाशी कसलाही संबंध नाही. देशामध्ये प्रामाणिक व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही. परंतु जे लोक भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत त्यांना त्यांच्या पापाची भीती ही असतेच.

मोदी पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांचे किती लोक तुरुंगात आहेत? आणि हेच विरोधी पक्षनेते आहेत का? परंतु जो पाप करतो तोच भीत असतो. प्रामाणिक माणसाला कशाचीच भीती असता कमा नये. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकले होते, हेसुद्धा समजून घेतले पाहिजे.

ईडीने कारवाई केलेल्या प्रकरणांमध्ये केवळ तीन टक्के प्रकरणे हे राजकारणाशी संबंधित आहेत. बाकी ९७ टक्के प्रकरणांमध्ये राजकारणाचा काहीही संबंध नाही, अशीही पुष्टी पंतप्रधानांनी दिली.

PM Modi Interview : ''मी मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला जेलमध्ये टाकलं होतं'' ईडी कारवायांवरुन मोदी थेटच बोलले
Narendra Modi Interview: 'प्राण जाये पर वचन ना जाये'; गॅरंटीच्या घोषणेबाबत पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केली भूमिका

ते पुढे म्हणाले की, तपास यंत्रणांनी केलेल्या कारवायांमध्ये ड्रग्ज माफिया आणि भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. ज्यांनी बेकायदेशीररित्या संपत्ती गोळा करुन मालमत्ता निर्माण केल्या, अशा लोकांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीदरम्यान ईडीने केलेल्या कारवायांचं कौतुक केलं. २०१४ मध्ये केंद्रात सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय एजन्सीने भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं ते म्हणाले.

''२०१४ पूर्वी ईडीने केवळ पाच हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. तेव्हा ईडीला कारवाया करण्यापासून कोणी रोखले होते? याचा फायदा कोणाला मिळत होता? आमच्या कार्यकाळामध्ये ईडीने एक लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. हा पैसा देशातील लोकांचा नाही का?'' असा सवाल उपस्थित करुन पंतप्रधानांनी ईडी कारवाईवर भाष्य केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com