
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली होती. यावरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, आता एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानं दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.