राम मंदिर न होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार- नरेंद्र मोदी

राम मंदिर न होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार- नरेंद्र मोदी

अलवार (राजस्थान)- देशभरात सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. या मुद्यावरून बोलताना आज राजस्थानमध्ये एका निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या निर्माणाला विलंब होण्यास काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावं अशी काँग्रेसची इच्छा नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.

राजस्थानच्या अलवार येथे एका प्रचारसभेत बोलताना मोदींनी राम मंदिराच्या मुद्यावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राम मंदिराच्या निर्माणाला विलंब होण्यास काँग्रेसच जबाबदार आहे. 2019 पर्यंत राम मंदिराचा निकाल यावा असं काँग्रेसला वाटत नाही. 2019 मध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे याबाबतची सुनावणी घेऊ नये अशी मागणी काँग्रेस आपल्या वकिलांद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे करते.

एवढेच नाहीतर काँग्रेसचे नेते न्यायाधीशांना महाभियोग प्रस्तावाद्वारे घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मोदी यांनी या प्रचारसभेत सांगितले आहे. मोठमोठ्या वकिलांद्वारे राम मंदिराचा मुद्दा ताटकळत ठेवण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक अयोध्येला गेले आहेत. राम मंदिर बांधलं नाही तर पुढे मंदिर बनेल, पण हे सरकार नाही बनणार, असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला अयोध्येतून दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com