मुंबई : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांना विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे. मोदी याने 25 सप्टेंबरला आणि चोक्सी याने 26 सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर राहावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
आणि चोक्सी यांनी "पीएनबी'मध्ये सुमारे दोन अब्ज डॉलरचा गैरव्यवहार केला आहे. सक्त वसुली संचालनालयाने या दोघांना फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. तसेच, दोघांची तीन हजार 500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगीही न्यायालयाकडे मागितली. या दोघांची भारतातील तसेच, ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याची परवानगीही मागण्यात आली आहे. यावर न्यायालयाने मोदीला 25 सप्टेंबरला आणि चोक्सीला 26 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले.
कालच (ता.25) राज्यसभेने फरारी आर्थिक गुन्हेगारांसंबंधीचे विधेयक संमत केले. लोकसभेत हे विधेयक 19 जुलैला संमत झाले आहे. फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरोधातही असाच अर्ज या महिन्याच्या सुरवातीला सक्त वसुली संचालनालयाने केला होता. मल्ल्या याला 27 ऑगस्टला हजर राहण्यासाठी न्यायालयाने समन्स बजावले आहे. मल्ल्या याने भारतातील बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पलायन केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.