लखीमपूरमध्ये गोळीबार नाही, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे

उत्तरप प्रदेशच्या लखीमपूर- खेरी या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात गोळीबार न झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
Lakhimpur Uttar Pradesh
Lakhimpur Uttar PradeshTeam eSakal

यूपीच्या लखीमपूर खेरीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला होता. देशभरात या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत. आता यासंदर्भात शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे.

मरण पावलेल्या चार शेतकऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये शेकऱ्यांचा मृत्यू शॉक लागून तसेच अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. लखीमपूर येथे शेतकरी आंदोलन सुरू असताना हिंसाचार झाला होता. यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर चार सरकारी कर्मचारी देखील मृत्यू पावले. या प्रकरणानंतर योगी सरकारवर देशभरातून टीका होत आहे. विविध माध्यमांवर लोक तीव्र असंतोष व्यक्त करत आहेत. आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर महत्वाचे खुलासे झाले आहेत.

तिकुनिया-बनबीरपूर रस्त्यावर वाहनांनी आंदोलकांना चिरडल्याने नक्षत्रसिंग, दलजीत सिंग, लव्हप्रीत सिंग आणि गुरविंदर सिंग अशी ओळख असलेल्या चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकरी संघटनेने केला आहे.

शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे की, 18 वर्षीय शेतकरी लव्हप्रीत साईचा फरफटल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यामध्ये रक्तस्त्रावाचा उल्लेख आहे. गुरविंदरसिंगच्या शरीरावर धारदार वस्तूंनी जखमा झाल्याचे आणि त्याचा मृत्यू देखील शॉक आणि रक्तस्त्रावामुळे झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com