लखनौ : भीषण उन्हाळ्यात उत्तर प्रदेशमधील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे महामंडाळाने राज्यातील आठ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा करणाऱ्या मालगाड्यांना लोहमार्ग रिकामा मिळावा आणि कोळशाची वाहतूक वेळेत व्हावी यासाठी या गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तीव्र उष्मा आणि कोळशाचा तुटवडा भासत असल्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूसह अनेक राज्यांना वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. राजस्थानमध्ये तीन तास वीजकपातीचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. कोळसा वाहतूक सुरळीत होण्यासाठी रेल्वे रद्द करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा केल्यानंतरच रेल्वे महामंडळाने घेतला असल्याची माहिती देण्यात आली.
रशियातून होणारा गॅसचा पुरवठा थांबला आहे. पण सध्या औष्णिक वीज केंद्रांत कोळशाचा दोन कोटी १० लाख टन साठा आहे. तो दहा दिवसांसाठी पुरेसा आहे. कोल इंडियासह भारताकडे एकूण ३० लाख टन साठा आहे. हा ७० ते ८० दिवसांसाठीचा साठा आहे.
- प्रल्हाद जोशी, केंद्रीय कोळसा मंत्री
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.