Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

Dog Bite Prevention: कुत्रा माणसाला पहिल्यांदा चावला तर मायक्रोचिप बसवणार आणि दुसऱ्यांदा कुत्रा चावला तर त्याला आजीवन कारावास देण्याचा प्रयागराज प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची आता चर्चा होत आहे.
Prayagraj Stray Dogs Issue

Prayagraj Stray Dogs Issue

ESakal

Updated on

भटक्या कुत्र्यांची आक्रमक होत चाललेली संख्या आणि मानवांना चावण्याची संख्या पाहता, प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने असा आदेश जारी केला आहे की, जो कुत्रा पहिल्यांदाच माणसाला चावेल त्याला १० दिवस एबीसी सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर त्याच्या शरीरात मायक्रोचिप बसवून त्याला सोडण्यात येईल. त्यानंतर जर कुत्रा पुन्हा एखाद्याला चावला तर त्या कुत्र्याला जन्मठेपेची शिक्षा होईल. त्याला आयुष्यभर एबीसी सेंटर म्हणजेच प्राणी जन्म नियंत्रण केंद्रामध्ये बांधलेल्या आश्रयगृहात ठेवण्यात येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com