Rahul Gandhi : अमेरिकेने लादलेले शुल्क अर्थव्यवस्थेला उद्‌ध्वस्त करेल : राहुल गांधी; केंद्र सरकारवर हल्लाबोल

New Delhi : भारत आणि चीनच्या राजनैतिक संबंधांच्या ७५ वर्षपूर्तीचे निमित्त साधून राहुल गांधींनी सवाल केला, की चीन आपल्या ४,००० चौरस किलोमीटर भूभागावर बसला आहे. काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र सचिव (विक्रम मिश्री) चिनी राजदूतासोबत केक कापत असल्याचे पाहून धक्का बसला.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Updated on

नवी दिल्ली : चिनी घुसखोरी आणि अमेरिकेची शुल्क आकारणी या मुद्द्यांवर लोकसभेमध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजपदरम्यान खडाजंगी झाली. चीनने चार हजार चौरस किलोमीटर भारताचा भूभाग बळकावला असून अमेरिकेने लादलेले शुल्क भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्णतः उध्वस्त करणारे आहे. याबाबत केंद्र सरकार काय करत आहे, असा सवाल राहुल गांधींनी केला. यावर भाजपने, काँग्रेसच्याच राजवटीत चीनने अक्साई चीनवर ताबा मिळविल्याचा दावा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com