Rahul Gandhi Bihar Voter Rights Yatra : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप करत त्यांच्यावर तीव्र निशाणा साधला..यावेळी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) असा इशारा दिला की, भाजपच्या नेत्यांची झोप उडवणारा 'हायड्रोजन बॉम्ब' ते लवकरच फोडणार आहेत. “भाजपच्या लोकांनी तयार राहावं, कारण आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलंय..त्यांनी पुढं भाषणात महत्त्वाची टीका करताना म्हटलं की, “ज्या शक्तींनी महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) मारलं, त्याच शक्ती आज संविधान संपवण्याच्या तयारीत आहेत.”.राहुल गांधी पुढं म्हणाले, मतचोरीवर आम्ही घेतलेली पहिली पत्रकार परिषद हा तर केवळ ‘अॅटम बॉम्ब’ होता. पण, आता जेव्हा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला चेहरा लपवण्यासाठीही जागा मिळणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.